आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

‘तिसरी मुंबई’ रायगड जिल्हात होणार!.. या संदर्भात स्थानिकि भुमिपुत्राचा तिव्र विरोध…


प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई दि. १९ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र सरकार रायगड जिल्ह्यात ‘तिसरी मुंबई’ (Third Mumbai) उभारणार आहे, ज्यात कर्नाळा, साई आणि चिरनेर या गावांचा समावेश आहे, जे नवी मुंबई विमानतळ (NMIA) आणि अटल सेतूच्या (Atal Setu) जवळ आहे; हा प्रकल्प MMRDA द्वारे New Town Development Authority (NTDA) अंतर्गत विकसित केला जात असून, रोजगार, तंत्रज्ञान आणि शिक्षणाचे मोठे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे, पण स्थानिक शेतकरी याला विरोध करत आहेत.
प्रकल्पाची प्रमूख वैशिष्ट्ये:
स्थान: रायगड जिल्ह्यातील उरण, पन्वेल आणि पेन तालुक्यांमधील सुमारे १२४ गावे (KSC – Karnala, Sai, Chirner).
उद्देश: मुंबई महानगरातील विकासाला चालना देणे, रोजगार निर्मिती करणे, आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान, शिक्षण व आरोग्य केंद्र बनवणे.
पायाभूत सुविधा: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, अटल सेतू (Mumbai Trans Harbour Link), आणि तटवर्ती रस्ता (Coastal Road) यांसारख्या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी मिळेल.
विकसन प्राधिकरण: MM R D A (Mumbai Metropolitan Region Development Authority) New Town Development Authority (NTDA) म्हणून काम करेल.
व्याप्ती: सुमारे ३३२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये हे शहर विकसित केले जाईल.
सद्यस्थिती आणि आव्हाने:
राज्य सरकारची भूमिका:

या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, खासगी कंपन्यांच्या मदतीने विकास करण्याचा सरकारचा मानस आहे.
स्थानिकांचा विरोध: अनेक स्थानिक शेतकरी आणि भूमीपुत्र या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहेत.
नाव: या शहराला ‘KSC New Town’ असेही म्हटले जाते.
हा प्रकल्प मुंबई महानगराच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, ज्यामुळे आर्थिक वाढीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. दुष्परिणाम : जंगल तोडणार शेती नष्ट होणार जंगली पशुपक्षी यांचे हाल होणारच पण स्थानिक भूमिपुत्रांच्या पोटावर पाय येणार जे जमिनीवरती शेती करत आहेत भाजी लागवड करत आहेत आणि आपला उदरनिर्वाह करत आहेत अशांची जमीन कवडी मोल किमतीत जबरदस्तीने सरकार घेण्याचे डाव आहे. हा काय विकासाचा पर्याय आहे का? असे स्थानिक बोलले. विकासाच्या नावाखाली आतापर्यंत एक नवी मुंबई वरती दोन मुंबई झाले, आता तीसरी मुंबई एक ठाणे होते दोन ठाणे झाले. अशाने लोकसंख्या वाढतच आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, बाहेरचे लोंढे मुंबई महाराष्ट्रातच येतात त्याला पाय बंद घातलाच पाहिजे. नाहीतर अशा किती ही नवीन मुंबई बनवा कमीच पडणार, मुंबई सोडून इतरही राज्य आहेत ना? त्या राज्यांनी आपापला विकास करावा मुंबईचे लोंढे थांबवावे. सरकारने मुंबई महाराष्ट्राच्या स्थानिक भूमिकांना देशोधडीला लावू नये. असे सर्व सामान्य जनतेचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!