
प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई दि. ०८ डिसेंबर २०२५ ग्राम पंचायत भरोडी ता. भिवंडी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रकल्प मुंब्रा देसई मार्गे भिवंडी तालुक्यातील भरोडी गावात कार शेडचे नियोजन करण्यात आले आहे. कार शेड मुळे गावातील सुरई फाटा अंजूर रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना अंजूर हायस्कूल येथे येण्यासाठी वेहेले गावातून यावं लागेल. विद्यार्थ्यांना व नागरिकांना ५ मी प्रवासासाठी १ तासाचा प्रवास करावा लागेल. गावातील सांड पाण्याचा निचरा होणार नाही. संपूर्ण गावाला नाहक त्रास होणार आहे.
यासंदर्भात सरपंच श्री. विलास बबन पाटील यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून भुयारी मार्गासाठी आंदोलन सुरु केले. सदर आंदोलनाला सर्व राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे, जेष्ठ नेते आर सी पाटील, श्री.अरुणकुमार पाटील, शेतकरी संघटना अंजुर दिवे, श्री.कुंदन पाटील, माजी खासदार , पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेते व सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी झाले. खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला आणि लवकरच सरपंच व कमिटीची दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांची भेट घेणार आहेत.
गावचे सरपंच कसे असावे हे विलास पाटील यांच्या कडून इतरांनी शिकावं. कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला नाही तर सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करता येतो. गावाच्या समस्या सोडवता येतात हे दाखवून दिले. ग्राम पंचायत भरोडी, ग्रामस्त मंडळ भरोडी, महिला वर्ग, शाळेत विद्यार्थी आम्हाला तुमचा अभीमान वाटतो.
गावात अशीच एकता कायम ठेवा. शेतकरी संघटना तुमच्या सोबत कायम राहील. असे यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.



