शासकीय कर्मचारी पेन्शन मागणी मान्य झाल्याबद्दल आभार, आता जनतेची रखडलेली कामे व शेतकर्याची पंचनामे त्वरित करा :- घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतम बनसोडे

(कोपरगाव प्रतिनीधी- अजय विघे) गेल्या काही दिवसां पासून शासकीय कर्मचारी पेन्शन मागणी संदर्भात आंदोलन चालु होते. हे आंदोलन लोकशाही पद्धतीने केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेन्शन योजना कामगारासाठी लागू केली होती. काही वर्षानंतर सरकारने २००५ ला बंद केली होती. पेन्शन कामगार रिटायर्ड झाल्यानंतर पेन्शन हाच पर्याय जीवन जगण्यासाठी असतो. याची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती. आजही लाखो कामगारासाठी पेन्शनचे महत्व कळाले. आज या आंदोलनाला यश आले त्याबद्दल अभिनंदन आता तुमच्या मागण्या मान्य झाल्या परंतु सर्वसामान्य जनता ही वेठीस धरल्या गेली होती त्यामुळे आता तुमच्या मागण्या मान्य झाल्या असून सर्वसामान्य जनतेच्या कामाला शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंचनाम्यांना महसूलच्या कामांना व रखडलेल्या सर्वसामान्य जनतेच्या कामांना कुठलीही दिरंगाई न करता सर्वसामान्यांनाही माणसाप्रमाणे वागणूक देऊन त्यांच्या कामांना चालना द्या असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे म्हणाले आहे.



