Uncategorized

२१ नोव्हेंबर संयुक्त महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन साजरा..

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुलुंड दि. २२ नोव्हेंबर २०२४ मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मधून ०१ मे १९६० दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी माणसासाठी हा अभिमानाचा दिवस असला तरीही त्यासाठी १०५ हुताम्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यांच्या बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ २१ नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी हुतात्म्य स्वीकाणार्‍यांचे स्मरण केले जाते. मुंबईत फ्लोरा फाऊंटनवरील त्यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली अर्पण केली जाते. आज महाराष्ट्र राज्याचा डंका जगभरात पोहचला आहे पण या राज्याची नेमकी निर्मिती झाली कशी? कोणकोणत्या आव्हानांना पार करून मराठी माणसाने महाराष्ट्र राज्य उभं केलं याबद्दलच्या इतिहासातील या काही घटना आजच्या महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी (Maharashtra Hutatma Smruti Din) या निमित्त पत्रकार सतिश वि. पाटील व सहकारी यांनी पुष्पहार व दिपज्योत लावून आपल्या प्राणाची बाजी लावणार्‍या १०५ हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहली !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!