आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय झाला! १२ वर्षानंतर भाजप सरकारचा शिक्षण मंत्रयाचा प्रथमच राजीनामा पंतप्रधान मोदींनी स्विकारला!

मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील )
दिनांक २६ जुलै २०२६ “दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा “
झुरळ म्हणून हिनवले होते आज सुशिक्षित तरूण पिढीने दाखवून दिले झुरळ काय करू शकतात कधी कोणाला कमी लेखू नये! एकीचे बळ काय असते ते आज सरकारला दाखवून दिले अनेकांनी आंदोलनात लाठ्याकाठ्या खाल्या पण हटले नाही, अनेक आजही हॉस्पिटल मध्ये भरती आहेत, हुकूमशाही चा आज पहिल्यांदा पराभव झाला!
निट-यूजी पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक Abhijeet Dipke यांनी केले होते, ज्याच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २५ जुलै २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.आंदोलनाचा घटनाक्रम आणि घडामोडीजंतर-मंतर आंदोलन: नीट परीक्षेतील गोंधळ व पेपरफुटीविरोधात अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन पुकारण्यात आले होते.राजीनाम्याची मागणी: जोपर्यंत शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका CJP ने घेतली होती.राजीनामा स्वीकारणे: अखेर वाढत्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून याला विद्यार्थ्यांचा व लोकशाहीचा विजय असे दिपके यांनी म्हटले आहे.पुढील मागण्याआर्थिक मदत: परीक्षेच्या गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत द्यावी.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवर झालेला जल्लोष आणि अभिजीत दिपकेंची यांना विद्यार्थी व आंदोलन यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला! आणि दाखवून दिले “दुनिया झुकती झुकेनेवाला चाहिये”! ऐतिहासिक विजय झाला. दिपके यांनी आज जंतरमंतर वर ज्या पेपर फुटीला बळी पडलेले , आत्महत्या केलेले निष्पाप विद्यार्थी होते त्याची पोस्टर लावून नावे घेऊन श्रद्धांजली वाहीली.तसेच सोनम वांगचूक यांनी काल २२ दिवसांनी उपोषण सोडले. या आंदोलनाला देशभरातून चांगला प्रतिसाद होता तसेच विदेशातून समर्थन मिळत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!