आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

“आवाज जनतेचा, लढा आपल्या मुंबईचा” अभियानाला आज पासून सूरूवात..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. १० जून २०२५ धारावीच्या नावाखाली मुंबई लुटणाऱ्यांचा डाव उधळून लावण्यासाठी ‘लढा आपला मुंबईचा’! कालिदास सभागृह, मुलुंड येथे मा. मंत्री शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘लढा आपल्या मुंबईचा’ अभियानांतर्गत प्रबळ आवाज उठवण्यात आला.
सरकारच्या भ्रष्ट धारावी पुनर्वसन व मुलुंड पीएपी प्रकल्पावर ठोस प्रश्न उपस्थित करत, धारावीकरांचं पुनर्वसन धारावीतच व्हावं, विकास अदानीचा नाही तर जनतेचा झाला पाहिजे अशी भूमिका मा. आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे मांडली. तथा या लढ्यासंदर्भात व प्रकल्पा संदर्भात त्यांनी मार्गदर्शन ही केले.
ईशान्य मुंबईतील हजारोंच्या संख्येने जनता व प्रकल्पग्रस्तांनी या लढ्याला साथ दिली. हा लढा केवळ धारावीकरांचा किंवा मुलुंडकरांकरिता नाही तर तो आपल्या मुंबईचा आहे. आजच्या या जनतेच्या उपस्थितीने कोणत्याही परिस्थितीत या लढ्यात आपण यश मिळवू असा विश्वास दाखवून दिला. या आधी देखील मोठ्या संख्येत मुलुंड मधून “मुलुंड बचाव” अंदोलन करण्यात आले होते.
उद्धव बाळासाहेब शिवसेना सर्व शिवसैनिक आणि मुलुंडकर नागरिकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला होता. सत्ताधारी सरकार धारावी प्रकल्प हा मुलुंडकरांवर लादला जाणार नाही असे फक्त बोलत होते. पण केंद्र सरकारकडून आदाणी समुहास हिरवा कंदील दिला असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अनेक तक्रारी केल्या पण दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पामुळे अनेक समस्यांना मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग या सर्वांना सामोरे जाव लागणार आहे .आधीच दाटीवाटी त्यात प्रकल्पाची भर पडणार आहे. असे आदित्य ठाकरे यावेळी बोलले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!