
प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई १८ डिसेंबर २०२५ शहापूर मधील ओमकार तारमले एक गरीब घरतील मुलगा आज क्रिकेट मध्ये नावलौकीक करत आहे़. घरची परिस्थिती मुळे स्वप्न भंगणार म्हणून हातांश झालेला, दिल्ली, सनराईज हैद्राबाद नंतर क्रिकेट सोडण्याची वेळ आली होती पण वडिलांनी जिद्द सोडली नाही. त्यांच्या लक्षात आल्यावर आपण मुलाला मदत करु शकलो नाही मुलाचे भविष्य चांगले घडो म्हणून त्यांनी बचत गटाकडून तीनलाख कर्ज काढले आणि आपल्या मुलाला शिक्षणासाठी त्रीपुरा येथे पाठवले. ओमकारने पण वडिलांच्या कष्टाच चीज केलं आणि पहाटे चार वाजता उठून वर्कआउट सुरु केला आणि त्यामध्ये त्याने सातत्य ठेवून पहीली शीडीची पायरी पार केली. त्रीपुरा येथून पहीली ऑफर आली होती. पण कल्याण मधल्या पहिल्या कोचला विचारून निर्णय घेतला. आयुष्यात माझं काय होणार हा विचार न करता फक्त झुंज देत राहिल्याने आज जागतीक दर्जाच्या ‘आयपीएल’ सारख्या मोठ्या टीमने तीस लाखाची बोली लावून सामील करून घेतले.



