महाराष्ट्रसामाजिक
कांद्यानंतर वांग्याने ही रडवलं, वांगी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संताप..

(कोपरगाव प्रतिनीधी-अजय विघे) कांदे आणि टोमॅटोनंतर आता वांग्यांचेही भाव पडल्याने जालन्यातील संतप्त शेतकऱ्यांनी वांगी रस्त्यावर फेकून दिली… आठवडी बाजारात वांग्याला एक रुपया किलो भाव मिळाल्याने पिंपळगाव रेणुकाई गावातील रामेश्वर देशमुख याच्यासह अनेक शेतकऱ्यांनी काल सर्व वांगी रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला..
दिवसभर आठवडा बाजारात बसून खर्चही निघत नसल्याचं लक्षात आल्यानंतर रक्ताचं पाणी करून पिकवलेली वांगी त्यांनी रस्त्यात फेकून संतापाला वाट करून दिली…




