गून्हादेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

अहो गृहमंत्री साहेब, महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का?

प्रतिनिधी बीड दि. २३ ऑक्टोंबर २०२३ बीड जिल्हा आष्टी तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून महिलेची विवस्त्र करत धिंड काढल्याचा आरोप झाला आहे. याचा व्हिडीओ ही समोर आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा किती वेळा बोजवारा उडतोय, कारवाईचे फक्त नाटक केले जातेय मग अटकेचे काय ? आरोपी हे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार असो कींवा कोणी जहागीरदार असो, यांना हे राज्य सरकार (ग्रहमंत्री) अटक करणार की नाही? हा खरा प्रश्न आहे” अहो गृहमंत्री साहेब, महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? कारवाईचे नाटक केले अटकेचे काय करणार ?”, असं म्हणत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमधील महिला निर्वस्त्र प्रकरणावरून देवेंद्र फडनविसांना असा सवाल केला आहे.
ही धक्कादायक घटना वाळूंज गावात घडली असून या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह अन्य दोघांवर बीडच्या आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेच्या वडिलांपासून गेली ५० ते ६० वर्षांपासून वाळुंज येथील शिवारातील जमीन पूर्वि वडिल व आता ती महिला कसत आहे. मात्र रघु, राहुल आणि सुरेश धस या पीडित पारधी कुटुंबाला जमिनीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. महिलेचा आरोप आहे की, शेतात काम करत असतांना रघु आणि राहुल यांनी येऊन माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला व मला विवस्त्र करण्यात आले. या घटनेला प्राजक्ता धस यांनी प्रोत्साहन दिल्याचे त्या महिलेने आपल्या तक्रारीत सांगीतले आहे. प्राजक्ता धस या भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी आहेत. ही घटना जेव्हां शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना समजली त्यानंतर त्यांनी लगेचच हलचाल सूरू करून प्रथम त्या आरोपींच्या अटकेची मागणी केली. या घटने वरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे जेंव्हा गुंडगिरी करतात, या वंचित, उपेक्षित, बहिष्कृत समाजातील माय माउल्यांच्या पदरांना हात घालण्याचा प्रयत्न करतात, तेंव्हा महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे बोलल्या. पूढे त्या असे ही म्हणाल्या आहेत की, “पारधी समाज हा बहिष्कृत, उपेक्षित आणि सामाजिक दृष्ट्या आर्थिक दुर्बल आहे. हा समाज कष्टाची भाकरी करून खाण्यासाठी मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या नव्या पिढीला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असें असताना प्रस्थापित गावगुंडांची दहशत मात्र कमी होत नाही असे मत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!