रत्नागिरी जिल्ह्यातील गोपाळगड किल्ला आणि मालकी हक्क वाद..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०२ जून २०२६ मुळात गोपाळगड किल्ला हा कोणाच्या मालकीचा नाही. सातबाऱ्यावर “महाराष्ट्र शासन गोपाळगड किल्ला” असा स्पष्टपणे उल्लेख आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावचे रहिवासी श्री. युनूस हुसैन मणियार यांचा गोपाळगड किल्ल्याशी काडीमात्र संबंध नाही आहे. १९६० साली भ्रष्ट गुहागर तहसीलदार कार्यालयाने श्री. युनूस हुसैन मणियार यांच्या वडिलांकडून पैसे खाऊन खोटे कागदपत्रे तयार केले आणि किल्ल्याच्या जागेचा लिलाव ₹ ३०० केला आणि त्यात श्री. युनूस हुसैन मणियार यांच्या वडिलांकडून हा किल्ला विकत घेतला असे कागदपत्रे तयार करण्यात आले. त्यादिवसापासून आतापर्यंत या कुटुंबाने गोपाळगड किल्ल्यावर कब्जा केला आहे. बेकादेशीर मार्गाने किल्ल्यावर ३१८ आंब्याची कलमे लावली आहे आणि दरवर्षी लाखों रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. किल्ल्याची तटबंदी तोडून त्याच्या दगडांचा वापर करून खंदग बुजवला आहे आणि किल्ल्याच्या बऱ्याच वास्तूंचे नुकसान केले आहे. किल्ल्याच्या आत गाडी जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी रस्ता तयार केला आहे त्यामुळे किल्ल्याचे नुकसान झाले आहे.
गुहागर तहसीलदार कार्यालय आणि गुहागर पोलिस स्टेशन यांना श्री. युनूस हुसैन मणियार हाताशी धरुन आहे त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. गुहागर तहसीलदार कार्यालय आणि गुहागर पोलिस स्टेशन यांची श्री. युनूस हुसैन मणियार यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे कारण स्थानिक लोकप्रतिनिधींचा या विषयाला पाठिंबा आहे.
सदर गोपाळगड व्हिडिओ वायरल होतो आहे त्यामध्ये दिसणारी व्यक्ती श्री. युनूस हुसैन मणियार यांचा सुपुत्र आहे.
श्री. युनूस हुसैन मणियार यांना महाराष्ट्र राज्य सरकारने त्वरित अटक करावी आणि त्यांच्यावर गोपाळगड किल्ल्याचे नुकसान केल्या कारणामुळे आणि किल्ल्यावर ७६ वर्षे कब्बा केल्यामुळे महाराष्ट्र पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्या तर्फे कलमे लाऊन फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्वरित अटक करावी.
गोपाळगड किल्ल्यासाठी गिरीमित्र प्रतिष्ठान संस्था मुंबई, स्थानिक गिर्यारोहक अक्षय पवार, गुहागरचे स्थानिक पत्रकार आणि किल्लेप्रेमी, अंजनवेल गावचे स्थानिक रहिवासी, आणि काही राजकीय पक्षांचे नेते मंडळी ज्यांच्या अखंड प्रयत्नामुळे आज महाराष्ट्र शासनाच्या सातबाऱ्यावर “महाराष्ट्र शासन गोपाळगड किल्ला” हा उल्लेख आहे असे गिर्यारोहक – शिवप्रेमी – निसर्गप्रेमी तसेच
अध्यक्ष – गिरीमित्र प्रतिष्ठान! यांनी सांगीतले.



