दि.०६/०६/२०२४ रोजी तहसिल कार्यालय, निगडी, पुणे येथे पिंपरी चिंचवड शहर मांतग समाजाच्या भव्य मोर्चातील मागण्या झाल्या मंजुर – अध्यक्ष संदिपान झोंबाडे
पिंपरी- प्रतिनिधी, दि.१२ जून २०२४ सहादिदिवसांन पूर्वी दि. ०६ जून २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या भव्य मोर्चाच्या प्रमुख ०६ मागण्या होत्या. त्यातील प्रमुख मागणी होती, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यालगत महामेट्रोकडून पिंपरी चिंचवड शहरातील शेवटचे मेट्रो टर्मिनल उभारणार असल्याने पुतळ्याची सिमाभिंत व उद्यान परिसरात मेट्रोचे खांब व पुतळ्यालगतच्या सिमाभिंत बाधीत करून, जीना व पुतळ्या पाठीमागे स्टेशन उभारणार असल्याने, मेट्रो टर्मिनलचा डिपीआर त्वरीत बदलण्यात यावा, ही मातंग समाजाची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी मंजुर करण्यात आली असून, त्यामध्ये डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजुस उभा राहणारा जिना तो बदलण्यात आला असून गार्डनच्या बाहेर बसविण्यात येणार असल्याची मंजुरी नकाशामध्ये दर्शविण्यात आलेले आहे.
त्यामुळे डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला कोणतीही बाधा येणार नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. तसेच भिंतीच्या एक मीटर पलिकडे मोकळी जागा ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे मातंग समाजाची पुतळ्यासंदर्भातील ही मागणी ही पूर्ण करण्यात आली असल्याने मातंग समाजबांधव समाधानी आसल्याचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी यावेळी सांगीतले.
उर्वरित मागण्यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा सूरू आहे. तसेच मातंग समाज कृति समितीने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पुतळा परिसर सुशोभिकरणाची मागणी करण्यात आली आहे. मेट्रो स्टेशन पूर्ण झाल्यानंतर पुतळा परिसर स्वच्छ व सुशोभिकरण करणार असल्याचे अधिकार्यांने सांगीतले आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज समिती अध्यक्ष नेते संदिपान झोंबाडे, कोअर कमिटी सदस्य डी.पी. खंडाळे, रामदास,कांबळे , लोकसेवक युवराज दाखले, चंद्रकांत दादा लोंढे, मंगेश डाखारे, संपत मांढरे, वसंत वावरे, गणेश कलवले, सुरेश भिसे, इत्यादी प्रमुख पदाधिकारी हाँटेल घरोंदा येथील पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.