
प्रतीनीधी सतिश पाटील मुलुंड मूंबई दि. ०४ डिसेंबर २०२४ काल लोकसभेत मा. खासदार संजय दि.पाटील यांनी अध्यक्ष दिलीप सैकीया यांच्या समोर मांडला.
रेल्वेमार्गावरील अनियमित पणा मुद्दा होणारे प्रवाशांची तारेवरील कसरत शाळा, काॅलेज विद्याथी, चाकरमानी, व्यावसायिक असे रोजचा प्रवास करणारे प्रवाशी वर्ग अनेक तक्रारी करून ही रेल्वेप्रशासन अधिकारी यांची उदासीन भूमिका घेते काही कारणास्तव एखादी ट्रेन रद्द होते पण आता रोजच या समस्येला प्रवासांना तोंड द्यावे लागत आहेत. दोन मिनिट गाडी लेट होणे शक्य आहे पण दहा पंधरा मिनिटांनी गाडी उशीरा असेल तर लाखो लोक रोजच रेल्वेने प्रवास करतात मिनिटाला गर्दी वाढत जाते त्यात चेंगराचेंगरीत अनेकांना दुखापत तर कधी जीवावर बेतले जाते मागील वर्षांपासून हा खेळखंडोबा सूरू आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी विनंती अर्ज अध्यक्षापुढे मा. खासदार संजय दि.पाटील यांनी सादर केला.



