आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शिटी बजाव वाहतुक कोंडी हटाव डोंबिवलीत आंदोलन..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. २० जानेवारी २०२५ लालबावटा रिक्षा युनियन-डोंबिवली वाहतुकीकडे दुर्लक्ष करून वाटमारी करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धती विरोधात लालबावटा रिक्षा युनयनचा दि.१६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ०६ वा. रामनगर रिक्षास्टॅन्ड, डोंबिवली पूर्व. डोंबिवलीतील वाहतूक पोलिसांच्या वाटमारी कार्यपद्धती मुळे शहरातील वाहतूकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना व्यवसाय करणे व सर्वच वाहनांना व पादचाऱ्यांना रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अत्यंत जिकीरीचे झाले आहे.
अरूंद रस्ते, रस्त्याच्या बाजूला अतिक्रमणे व एकाचवेळी अनेक रस्त्यांची खोदकामे सुरू केल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळी व संध्याकाळी तर वाहतूक कोंडीमुळे रिक्षा चालकांना एक प्रवासी सोडून परत स्टेशनकडे येण्यास अर्धा एक तास लागतो. त्यामुळे संध्याकाळी रेल्वे स्टेशन लगतच्या रिक्षा स्थानकांवर प्रवाशांना वेळेवर रिक्षा मिळत नाही. वाहतूक पोलीस मात्र फिक्स पाँईंटवर वाहतूक सुरळीत करण्यास दुर्लक्ष करून शहराच्या कानाकोपऱ्यात वाटमारी करत फिरत असतात.
रिक्षा चालकांचे लहानसहान कारणाने मोबाईलद्वारे फोटो काढून कारवाईचा धडाका लावला आहे. एका एका रिक्षा चालकावर ५ ते ५० हजार रूपये इतकी दंड वसूली थकीत दाखवत आहे. त्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत.
   पार्किंग व नो-पार्किंगचे नियम तर वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष करून पूर्णपणे थाब्यावर बसवले आहेत. राथरोडवरील एकेरी वाहतूक असूनही वाहतूक पोलीसांच्या समक्ष दुहेरी वाहतूक सुरू आहे. वाहतूक पोलीस मात्र त्याकडे खुलेआम दुर्लक्ष करत आहेत. 
पाटकर रोड, चिमणी गल्ली, नेहरू रोड येथील अधिकृत रिक्षा स्थानकात दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहेत. रिक्षा स्थानकात पार्किंग करणारे वाहन चालक व रिक्षाचालक यांच्यामध्ये वारंवार वाद होत आहेत.
  शहरात नियमानुसार व शिस्तबद्ध वाहतूक चालावी याकरिता वाहतूक पोलीस कोणतीही उपाययोजना करत नाहीत. वाहतूक शाखेच्या मुख्य उद्देशानुसार शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यास प्राधान्य दिले पाहिजे व आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. परंतु वाहतूक पोलीस फक्त कारवाई करून वसूली करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे डोंबिवली शहरातील रिक्षाचालक व पादचारी नागरिक वाहतूक कोंडी मधून मार्गक्रमण करण्यास प्रचंड त्रस्त झाले आहेत.
    या सर्व परिस्थितीच्या विरोधात लालबावटा रिक्षा युनियनच्या वतीने “शिट्टी बजाव वाहतूक कोंडी हटाव आंदोलन” आयोजित केले आहे.
              आंदोलनाच्या मागण्या
1) वाहतूक पोलिसांच्या फिक्स पाँईंटवर नेमणूका कराव्यात. ( डोंबिवली पूर्व १.रामनगर रिक्षास्टँण्ड चौक २. इंदिरा गांधी चौक ३.बाजीप्रभू चौक ४.भाजीमार्केट चौक ५. चार रस्ता चौक ६.नामदेव पथ क्रास रोड ७.टिपटाँप चौक (डोंबिवली प. १. द्वारका चौक २. मच्छीमार्केट रिक्षास्टँण्ड चौक ३. महात्मा फुले चौक )
2) अवजड वाहने व ट्रव्हलिंग कंपनींच्या मोठ्या बसेस यांना सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन परिसर,टिळक चौक, टिळक रोड,चार रस्ता,मानपाडा रोड,फडके रोड, इत्यादी गर्दीच्या रस्त्यावर पूर्वीपासून वाहतूक शाखेने बंदी घातलेली आहे, त्याची अमलबजावणी करणे.
3) अधिकृत रिक्षा स्थानकांमध्ये इतर वाहने अनधिकृतपणे पार्किंग केली जाते ती अनधिकृत पार्किंग बंद करा.
4) एकेरी वाहतूक आणि पार्किंग- नो पार्किंग याबाबत योग्य अमलबजावणी करा.
5) मोबाईलद्वारे रिक्षाचे फोटो काढून अन्यायकारक दंड आकारणी बंद करा आणि दंडाची रक्कम कमी करा.
6) केळकर रोडवरील परतीच्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था पादचारी पुलाच्या मधल्या जिन्या जवळ करा.
7) रेल्वे स्टेशन लगतच्या सर्व अधिकृत रिक्षा स्थानकावर शिस्तबद्ध रांगा लावण्यासाठी रेलिंग लावा.
या संदर्भात वाहतूक विभागाला निवेदन ही देण्यात आले.
यावेळी काँम्रेड काळू कोमास्कर, काँम्रेड राजू परांजपे, काँम्रेड प्रविण पाटील, काम्रेड अरूण वेळासकर, काँम्रेड पदमाकर पाटील, श्री मधुकर माळी, काँम्रेड रामदास वायंगडे, काँम्रेड महेश आवारे, श्री सोनू श्रीवास्तव, काँम्रेड विलास शेलके, डॉ. शोभा पाटील, श्री दयानंद म्हात्रे, श्री राम म्हात्रे, काँम्रेड राजू शिंदे, काँम्रेड संतोष गायकवाड, काँम्रेड युवराज साळवी, काँम्रेड.राजेश कदम, काँम्रेड प्रकाश पवार, काँम्रेड राजन सावंत, काँम्रेड सुनील पाटील, काँम्रेड विनायक प्रभू, काँम्रेड देविदास कांबळे, काँ. विजय चिकणकर तसेच असख्य जनसमूदाय उपस्थित होते.



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!