पोलिसमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

मुंबई पोलिस आयुक्त पदी देवेन भारती याची नियुक्ती..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. ०९ जून २०२५ पहिल्याच गुन्हे परिषदेत सर्व पोलीसांची कडक शब्दात कानउघडणी करण्यात आली. सर्व अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी प्रत्येक झोनमधील वरिष्ठांची असणार कामात प्रामाणिकपणा, हलगर्जीपणा,भ्रष्टाचार, अन्याय, खपवून घेतला जाणार नाही असे देवेन भारती यांनी यावेळी सांगीतले. देवेन भारती हे १९९४ बॅचचे आई पी एस अधिकारी आहेत.२६/११ मधील चौकशी अधिकारी होते.
पोलिसांवरच ‘हप्तेखोरी’चा आरोप;
नीट काम न केल्यास थेट कारवाई, देवेन भारती यांनी पदभार सांभाळताच सज्जड इशाराच दिला. रस्त्यावरील गुन्हेगारीपासून अंडरवर्ल्डच्या कारवायांपर्यंत सर्व मुद्द्यांना हात घालत, नीट काम न केल्यास थेट कारवाई करण्याचा इशाराच भारती यांनी दिला.
मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी बुधवारी पोलिसांना कडक शिस्तीचा इशारा दिला. बार, जुगार अड्ड्यांवर छापे टाकणारी समाजसेवा शाखा पहिल्याच गुन्हे परिषदेत आयुक्तांच्या निशाण्यावर होती. पोलिसांकडून पैसे घेतले जात असल्याच्या आरोपांवरून आयुक्तांनी सर्वांना खडे बोल सुनावले. रस्त्यावरील गुन्हेगारीपासून अंडरवर्ल्डच्या कारवायांपर्यंत सर्व मुद्द्यांना हात घालत, नीट काम न केल्यास थेट कारवाई करण्याचा इशाराच भारती यांनी दिला.
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर देवेन भारती यांनी साधारण महिन्याभरानंतर बुधवारी पहिलीच गुन्हे परिषद घेतली. मुंबईतील सर्व पोलिस ठाणी, गुन्हे शाखा, विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सर्व सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त असे वरिष्ठ अधिकारी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातील या परिषदेला उपस्थित होते. पहिलीच गुन्हे परिषद असल्याने सर्वांची आयुक्तांसमोर ओळख परेड झाली आणि त्यानंतर भारती यांनी महिनाभरात केलेले अवलोकन आणि आपल्याला अपेक्षित असलेले काम याबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले.
पोलिसांची समाजसेवा शाखा सुरुवातीपासूनच देवेन भारती यांच्या निशाण्यावर राहिलेली आहे. बुधवारीही त्यांनी समाजसेवा शाखेच्या कामाचा लेखाजोखा मांडताना स्पष्ट शब्दात सुनावले. बार, हुक्का पार्लर, जुगाराचे अड्डे यांच्यावर छापे टाकणे एवढेच समाजसेवा शाखेचे काम नाही, तर मानवी तस्करी, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, देहव्यापाराच्या दलदलीतून महिलांची सुटका, बालकामगार शोधणे ही महत्त्वाची कामेही आहेत. त्यामुळे या शाखेतील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. बार तसेच इतर आस्थापनांवर लक्ष ठेवण्याचे काम स्थानिक पोलिसही करू शकतात, असेही ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पैशाच्या देवाणघेवाणीचे आरोप पोलिसांवर नेहमीच केले जातात. आयुक्तांच्या नावाने अधिकारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत असतात. अशा तक्रारींमध्ये काही तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भारती यांनी पोलिसांना दिला. सकाळी सुमारे दहा वाजता सुरू झालेली गुन्हे परिषद दुपारी दीडच्या सुमारास संपली.
गुंडांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अंडरवर्ल्ड गाजवणाऱ्या आणि सध्याही आपापल्या परिसरात दबदबा असलेल्या काही गुंडांची नावे घेत त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश भारती यांनी पोलिसांना दिले. रस्त्यावरील गुन्हेगारी, बेकायदा फेरीवाले व त्यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यांसारख्या विषयांवर आपले मत मांडत देवेन भारती यांनी पोलिसांना कारवाईची दिशा दाखवल्याचे सूत्रांकडून समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!