रांजणगाव नरहरी येथे उद्या ५ वी आखिल भारतीय बौध्द धम्म परिषद..
गंगापूर : (प्रतिनीधी – अजय विघे) गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी येथे ५ व्या आखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि.२५) सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत रांजणगाव नरहरी येथील कम्मभुमी येथे ५ व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धम्म परिषदेचे संयोजक भिक्खु शाक्यपुत्र अमृतानंद बोधी व पोपट दुशिंग यांनी दिली.
पुज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली व थायलंड येथील पुज्य भिक्खु बुनली महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पुज्य भिक्खु डॉ.प्र. एम. सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाची रूपरेषा या प्रमाणे राहील सकाळी १० वाजता धम्म परिषदेचे धम्म ध्वजारोहन, सकाळी ११ वा भिक्खु संघाचे भोजन, दुपारी १२ वाजता बोधीवृक्ष पुजन व दिप
प्रज्वलन, दुपारी १ वा धम्मसम्राट स्मरणीका प्रकाशन सोहळा, धम्मभूषण पुरस्काराचे वितरण, सायं. ६ वा उपस्थित भिक्खु संघाची धम्मदेसना मंगलमैत्री व राष्ट्रगीत, रात्री ७.१० वाजता ही रात्र वामनाची या विशेष विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना धम्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. धम्म परिषदेचे अध्यक्ष भिक्खु शाक्यपुत्र अमृतानंद बोधी, नितीन जाधव, प्रा. डॉ. संदीप गायकवाड , ए.टी.पगारे, रंजक सिरसाठ, लक्ष्मण उबाळे, , संजय आल्हाट, संजय कांबळे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. धम्म परिषदेसाठी येणार्या सर्व समाज बांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करुन उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.