आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीक्षेत्र देहूगावात १६ टन कचऱ्याचे संकलन

पिंपरी चिंचवड आणि मावळमधील सुमारे १००० सदस्य मोहिमेत सहभागी

अभियानाच्या माध्यमातून दिला स्वच्छतेबाबत जागरुकतेचा संदेश

प्रतिनिधी देहू दि. १७ मार्च २०२५ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी श्रीक्षेत्र देहूगाव आणि भंडारा डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत आज सकाळी ६ ते ८ या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत श्रीक्षेत्र देहू परिसर , मंदिर परिसर, ईंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सुमारे १६ टन कचऱ्याचे संकलन केले. यामध्ये २ टन ओला कचरा आणि १४ टन सुका कचरा संकलित करण्यात आला. यावेळी गाथा मंदिर ते मुख्य कमानपर्यंत दुतर्फा रस्त्याची व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता या अभियानात करण्यात आली.
भारताचे स्वच्छतादूत महाराष्ट्र भूषण तथा पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आज देहूगाव याठिकाणी घेण्यात आले. या अभियानात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील सुमारे १००० सदस्यांनी सहभाग नोंदवला.
“स्वच्छ देहू, पवित्र देहू” या संकल्पनेला बळ देत, सर्व सदस्यांनी देहूतील मुख्य मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट परिसर, गाथा मंदिर तसेच भंडारा डोंगरातील पवित्र स्थळे स्वच्छ केली. त्याचबरोबर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली.
(चौकट)
अभियानाची वैशिष्ट्ये:
हजारोंच्या संख्येने श्रीसदस्यांचा सहभाग
सकाळपासूनच प्रतिष्ठानचे सदस्य देहू आणि भंडारा डोंगर परिसरात पोहोचले.
स्वच्छता आणि जनजागृती – प्लास्टिक कचरा, पत्रावळी, तसेच अन्य कचऱ्याची सफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
वारकरी संप्रदायाच्या पवित्र भूमीचे जतन –
संत तुकाराम महाराज यांचा पवित्र देहू स्थळ स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवते. यंदा संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानंतर देहू आणि भंडारा डोंगर येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक ग्रामपंचायत, प्रशासन, वारकरी संप्रदाय, आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ” प्रत्येकाने कर्तव्य म्हणून स्वच्छतेबाबत जागरूक रहात स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा” असा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!