अपघातदू:खद वार्तादेश-विदेशविशेष
ब्रेकिंग न्यूज एअर इंडिया विमान अपघात अहमदाबाद

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. १२ जून २०२५ अहमदाबादमधील मेघानीजवळ कोसळलेल्या एअर इंडियाचे प्रवासी विमान टेकऑफच्या अगदी १० मिनीटांत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री पटेल यांनी दिले आहे. एअर ॲंम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात २४२ प्रवासी होते. जखमींना बाजूलाच असणाऱ्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने दाखल करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले. (आपत्कालिन क्रमांक: 18005691444) दिला आहे.




